तुषार सिंचनाचे फायदे १) तुषार पद्धतीत पाण्याचा नाश होत नाही. २) प्रवाही सिंचनापेक्षा सिंचन क्षमता जास्त मिळते. ३) तुषार सिंचन पद्धत जवळजवळ सर्व पिकांच्या सिंचनासाठी वापरता येते. ४) पाण्याची २५ ते ३५% बचत होते ५) पाणी सर्व ठिकाणी ठिकाणी समप्रमाणात पाहिजे तेवढे देता येते. ६) पाण्याचा प्रवाह कमी असतानासुद्धा पाहिजे तेवढे पाणी देता येते. ७) पावसासारखे पाणी पिकांवर पडते त्यामुळे काही किडी-रोग धुऊन जातात. ८) पाने आणि ताटे स्वच्छ राहतात. ९) द्रवरूप रासायनिक खाते तुषार-सिंचनाद्वारे देता येतात. खाते पिकाच्या मुळाशी पडतात. त्यामुळे खताचा कार्यक्षम वापर होऊन बचत होते. १०) ठिबक सिंचन पद्धतीपेक्षा दरएकरी खर्च कमी येतो.. ११) जमीन सपाट करण्याची अगर रानबांधणीची गरज नसते. १२) मजुरीवरचा खर्च कमी येतो. १३) पीक उत्पादनात १२ ते २०%वाढ होते. 2.3K views11:19