आज आपला सहकारी अमर आपल्यामधून निघून गेला ही बातमी काळजाला चटका लावून जाणारी आहे. त्याने एवढं टोकाचं पाऊल उचललं याला या सरकारचे धोरणं जबाबदार आहे यात शंका नाहीचं परंतू, याला बऱ्याच अंशी विद्यार्थ्यांनाचा षंढपना जबाबदार आहे.
सरकारने काहीही केलं तरी आपल्याला सहन करण्याची सवय पडली आहे. सरकारला विरोधकारणारे विद्यार्थी खूप कमी आहेत.
आणि जे विरोध करतात त्यांची टिंगल करणारे, त्यांना नावं ठेवणारे खूप आहेत.
विद्यार्थ्यांना अजूनही सांगणं आहे अमर सारखी वेळ तुमच्यावरही येऊ शकते हे विसरू नका. सरकारने ही वेळ प्रत्येक विद्यार्थ्यांवर आणून ठेवली आहे.
त्यामुळं सध्या असेही आपलं आयुष्य अंधारात आहे. आपल्या आवाज उठवण्याने जर त्यात प्रकाश येत असेल तर भवांनो तुम्हांला हात जोडून विनंती आहे वाईटाला विरोध करा.
स्वतःचा व आपल्या सहकाऱ्यांचे जीव वाचवायचे असतील तर या सरकारच्या भ्रष्ट कारभाराला विरोध करा.
उद्या आरोग्यविभाग भरती विरोधात होणाऱ्या twitter मोहिमेत सहभागी व्हा.
वेळ 11 ते 12 दरम्यान.
आपला सहकारी अमर याला भावपूर्ण श्रद्धांजली.